राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे नाव सात बारा उताऱ्यावर येईल. आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. .
राहाता तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे जागेच्या संदर्भात विशेष पाठपुरावा करून तेथील रहिवाश्यांच्या नावावर जागा करण्याबाबत डॉ. विखे पाटील यांनी रहिवाशी व स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक राहाता बाजार समितीत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष, विजय सदाफळ उपनगराध्यक्ष नगरसेवक कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, कानीफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन,सतिश बावके, विकास बावके, हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, शहा, किशोर दंडवते आदी यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, राहाता येथील 340 आणि साकुरीची गोदावरी वसाहत या जागेबाबत अनेक मोठ्या तंत्रिका अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा वनविभागाची आहे आणि अनेक अडचणी येतील अशी काहींनी शंका उपस्थित केली होती. परंतु सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, हा सर्व सामान्य जनतेला विश्वास होता. आणि आपण या बाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून विश्वास सार्थ ठरवला. या जागेच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण सातबाऱ्यावर सरकार असे नाव लागले होते. गुंतागुंत वाढली होती. परंतु दोन दिवस आधी आपण महाराष्ट्र शासन असे नाव लावून घेतले. त्या मुळे आता कायदेशीररित्या स्थानिक नागरिकांच्या नावावर जागा करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या मुळे तुमची जागा तुमच्या नावावर फक्त आणि फक्त सुजय विखे च करू शकतो! असे सांगून डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून जागा नावावर करण्याचा संघर्ष 340 व गोदावरी वसाहतीतील रहिवाश्यांचे संपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा प्रश्न सोडविला. विधानसभेच्या निवडणुकीत तुमची जागा तुमच्या नावावर करून देतो हा शब्द आपण पाळला. याचा आपल्याला अभिमान आहे. आपण राजकारणात ऐश्वर्य कमावले, वैभव कमावले परंतु आपण विश्वासाहर्ता कमावली हा मोठा आनंद आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील आपल्या शब्दावर काढले. पोलिस फाटा लागला नाही. त्या मुळे आता प्रत्येकाच्या नावावर 25 लाख रुपये किमतीची जागा झाली आहे.
सर्वांच्या विश्वासामुळे पालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली. साकुरीतही आपण 5 कोटींचे कामे करू शकलो. अंतर्गत गटारी, रस्त्यांचे कामे मार्गी लागली. तुम्ही सर्वजण मतभेद विसरून एकत्र आला म्हणून हे शक्य झाले. राहाता शहराला किती निधी दिला. हे मी आत्ता सांगणार नाही.
0 Comments