शिर्डी (प्रतिनिधी)-नर्मदा मैयाजीच्या पूर्ण पायी परिक्रमेला अध्यात्मिक दृष्टीने मोठे महत्त्व असून सुमारे तीन हजार सहाशे किलोमीटरची ही परिक्रमा पायी अनेक जण भक्ती भावाने करतात.
पण ही परिक्रमा ज्यांना शक्य होत नाही ते अनेक जण स्कंदपुराण ,नर्मदा पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा 21 किलोमीटरची पायी परिक्रमा करून संपूर्ण पायी परिक्रमेचे फळ मिळते. असे म्हटले आहे. म्हणूनच दरवर्षाप्रमाणे यावर्षीही महंत श्री नर्मदेश्वर संन्याशी आत्माराम गिरी ट्रस्ट पिंपरी निर्मळ च्या वतीने चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा पायी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. हे परिक्रमेचे चौथे वर्ष होते.महंत संन्यासी आत्माराम गिरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्तर वाहिनी नर्मदापायी परिक्रमा नुकतीच मोठ्या उत्साहात अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाली. महंत आत्माराम गिरीजी महाराजांचे मार्गदर्शनाखाली पाच क्रुझर जीप प्रवासासाठी केल्या होत्या. सुमारे 50 भाविक या जीपमधून नर्मदा मैयाच्या पायी उत्तर वाहिनी परिक्रमे साठी गेले होते. ह भ प हरिभाऊ गुंजाळ व सुदाम देवा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जीप, तर ह भ प मच्छिंद्र महाराज इंगळे व विठ्ठल हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी जीप , तसेच ह भ प विनायक महाराज इंगळे व ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी तसेच अर्जुन महाराज इंगळे व बाबू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे वाहन आणि पाचवी जीप गाडी मामा राशिनकर व अर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा मैया कडे मोठ्या उत्साहात रवाना झाल्या. श्री कुबेर भंडारी ,पावागडचे दर्शन करून तिलकवाडा येथून रामपुरा व परत तिलकवाडा अशी 21 किलोमीटरची पायी परिक्रमा या सर्व भाविकांनी महंत संन्याशीआत्माराम गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली
नर्मदे हर -जिंदगीभर, हर हर महादेव घरघर महादेव, बम बम बोले मस्ती मे डोले! असा जयजयकार करत भजन गात व श्री कुबेर भंडारी, श्री गरुडेश्वर, दत्त मंदिर, पोरीच्या येथील निळकंठ धाम, श्री स्वामीनारायण मंदिर, श्री शुल्कानेश्वर महादेव मंदिर, कपिलेश्वर तीर्थ कामदेश्वर तीर्थ आदी अनेक देवस्थाने व मंदिरांना, तीर्थांना भेटी देत, दर्शन करत एका दिवसात ही पायी परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेत महंत संन्याशी आत्मारामगिरीची महाराज यांनी भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करताना म्हटले की, मा नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करताना एक वैद्य अर्थात डॉक्टर भेटला. तो डॉक्टर कोण आहे .तो वैद्य कोण? तर तो सामान्य देहाचा उपचार करणारा नसून, तो चैतन्याचा स्पर्श देणारा दिव्य चिकित्सक आहे. तो म्हणजेच भोलेनाथ शंभू महादेव आहे. श्री नर्मदेश्वर भगवान आहे. त्यांच्या कृपादृष्टीत अशी अलौकिक औषधी शक्ती आहे की, जी केवळ शरीराचे नव्हे तर मन, बुद्धी आणि आत्म्याचेही रोग हरवते.या दिव्य वैद्याची औषधी काय? ती म्हणजे पवित्र नर्मदा जल. नर्मदा ही केवळ नदी नसून, ती शिवस्वरूपिणी माता आहे. तिच्या प्रत्येक थेंबात शिवतत्त्वाचा स्पंदन आहे, ज्यामुळे अंतःकरणातील क्लेश, पापबुद्धी, आणि अज्ञानरूपी रोग हळूहळू नाहीसे होतात.
जेव्हा साधक श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण समर्पणाने नर्मदा जल ग्रहण करतो किंवा त्याचा स्पर्श अनुभवतो, तेव्हा तो फक्त जल पित नाही, तर तो शिवकृपेचा अमृतरस पितो. हेच अमृत त्याच्या अंतर्मनातील विकार धुऊन काढते, दुःखाचे सावट दूर करते आणि आत्मज्ञानाचा प्रकाश जागवते.
अशा या दिव्य डॉक्टरने श्री नर्मदेश्वर भगवानांनी आणि त्यांच्या अद्भुत औषधीने नर्मदा जलाने असंख्य जीवांचे आध्यात्मिक उपचार केले आहेत. ज्यांना जगातील कोणतेही औषध बरे करू शकत नाही, अशा अंतःकरणातील वेदनांवर हा एकच उपाय आहे तो म्हणजे —शिवस्मरण, नर्मदा स्नान आणि अखंड श्रद्धा.
अखेर, हा अनुभव शब्दात मावणारा नाही; तो फक्त अनुभूतीत उतरतो. आणि ज्याला ही अनुभूती झाली, त्याच्यासाठी श्री नर्मदेश्वर भगवान हेच खरे वैद्य, आणि नर्मदा जल हेच सर्वोत्तम औषध ठरते.
ज्या भाविक भक्तांनी माझे बरोबर नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेतला त्या सर्वांना नम्र निवेदन आपण आणलेले नर्मदा जल नसून ते मोठे औषध आहे. शक्ती आहे दररोज पूजन करा शिवस्मरण करा, आनंदी राहा निरोगी रहा व्यसनमुक्त व तणावमुक्त जीवन जगा हीच सर्वांसाठी परिक्रमेचे फळ आहे. असे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी यावेळी परिक्रमेतील भाविकांना व सर्व साधक, भक्तांना उपदेश केला. यावेळी परिक्रमेतील भाविक तसेच इतर भक्तगण उपस्थित होते.
0 Comments