राहाता (प्रतिनिधी)
सर्व वाकडी खंडोबाची गावातील शेतकरी बंधू भगिनींनी यांना कळविण्यात येते की आपण 26/1/2025 रोजी ग्रामसभेत ठराव केला होता की शेती पंपाना कमी दाबाने विजपुरवठा होतो त्यामुळे वाकडी सबस्टेशन मधुन चितळी येथील कंपनीस लाईट जोडू नये असे महावितरण कंपनीचे श्रीरामपूर कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती परंतु महावितरण कंपनीने चितळीला लाईट जोडल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी विजपुरवठा होत आहे शेवटच्या पाण्यावर पिके आहे उन्हाळ्यात पिके जळत आहे तरी उद्या दिनांक 4/3/2026 बुधवारी सकाळी 9 वाजता वाकडी सबस्टेशन वर शेतकऱ्यांचा मौर्चा जाणार आहे तरी शेतकरी बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
या शेतकरी आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य शेतकरी संघटना शिवसेना तसेच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
0 Comments