महिला दिन
===================
= ==महिलांचा करा सन्मान;
तरच देश बनेल महान!!! ===
आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून देणारा जागतिक असा दिवस मानला जातो.
आपल्या भारत देशामध्ये महिलांना धार्मिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ते महान कार्य महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी केले आहे. सुरुवातीलाच श्री चक्रधर स्वामी यांनी स्री समानतेचा पाया घातला. माझ्या माहितीप्रमाणे स्त्रियांना अतिशय हिनअश्या प्रकारची वागणूक दिली जात असे. त्या काळामध्ये स्त्रियांना फक्त ^^चूल आणि मूल ^^इतकाच अधिकार दिला गेला होता.स्री म्हणजे फक्त उपभोग व कष्ट याचेचं साधन आहे. असा समज त्या काळामध्ये पुरुष जातीमध्ये रूढ झाला होता. स्त्रियांनी कोणत्याच सामाजिक क्षेत्रामध्ये भाग घेऊ नये ;अशा प्रकारची भावना पुरुष प्रधान संस्कृतीची झालेली होती. आणि मग म्हणूनच समाजात समानतेने वावरणे ;संपत्तीवरील अधिकार ;त्यानंतर शिक्षण आणि मतदान यासारख्या महत्त्वपूर्ण व जबाबदारीच्या अधिकारापासून त्या काळी संपूर्ण स्त्रिया या वंचित राहिल्या होत्या. मात्र कालांतराने परिस्थिती बदलत गेली. 19 व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर जो अन्याय होत आहे ;त्या अन्यायाच्या संदर्भात स्त्रियांमध्ये कालांतराने समज येऊ लागली.
आणि मग नंतर याच उदात्त भावनेतूनच स्री वादाचा जन्म झाला. त्या काळामध्ये मुलींना शाळेत पाठविणे हे पाप समजले जात असे. जर समजा एखाद्या कुटुंबाने आपल्या मुलीला शाळेत पाठवले तर त्या कुटुंबाला वाळीत टाकले जात असे .म्हणून त्या काळातील मुली या शिक्षणापासून वंचित राहिल्या आणि त्यांच्यावर फक्त घरकाम करणे ;मुलांचे संगोपन करणे ;थोडक्यात सारांश रूपाने स्त्रियांनी फक्त ^^चूल आणि मूल°^ एवढ्याच क्षेत्रात वावरणे अशी प्रथा त्या काळामध्ये रूढ झाली होती. स्त्रियांना कुठल्याच प्रकारचा मानसन्मान त्या काळामध्ये मिळत नव्हता. स्त्रियांनी समाजातील कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे नाही. वर पुरुषांशी बोलायचे नाही. वर मान करून चालायचे नाही. समोरून रस्त्याने एखादी पुरुष मंडळी जर येत असेल तर ती व्यक्ती नजरेआड होईपर्यंत स्रीनेआपल्या पायातील चप्पल हातात उचलून घेऊन अनवाणी चालणे अशा प्रकारची पद्धत देखील अस्तित्वात होती. त्यानंतर^ केशवा पण पद्धती^सती जाणे^<विधवा विवाह पद्धती अशा अनेक प्रकारच्या अनिष्ट चालीरीती रूढी प्रथा परंपरा त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या . एखाद्या स्त्रीचा पती मयत झाला तर त्या स्त्रीला पतीच्या सरणामध्ये इच्छा नसतानाही लोटले जात असे. त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाची पत्नी मयत झाली तर त्या पुरुषांनी किती विवाह केली तरी चालत होते. स्रीयांनी पुनर्विवाह करणे नाही अशा प्रकारची प्रथा देखील त्या काळामध्ये अस्तित्वात होती. नंतर कालांतराने काही प्रमाणात का होईना समाजामध्ये महात्मा फुले. सावित्रीबाई फुले. राजाराम मोहनराय व आदींसारख्या समाजसुधारकांनी या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठीआटोकाठ प्रयत्न केले .आणि त्यातूनच श्री शिक्षणाच्या चळवळीने ही जोर धरला. श्री शिक्षणाला महत्त्व कसे प्राप्त होईल .समाजाला शिक्षणाचे महत्त्व कसे कळेल? याबाबत समाजसुधारकांनी समाजामध्ये जागृती करण्यासाठी रात्रंदिवस जनजागृती करण्याचे काम केले.
प्रसंगी या समाज सुधारकांनी समाजातील या अनिष्ट चालीरीती;रुढी. प्रथा; परंपरा नष्ट करण्यासाठी आपल्या स्वतःच्या घरादाराचा कुटुंबाचा विचार न करता समाज सुधारण्याच्या कार्याला अहोरात्र वाहून घेतले व श्री शिक्षणाचा पाया या समाजसुधारकांनी समाजामध्ये घालून दिला व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. समाजसुधारकांच्या प्रयत्नातून स्री शिक्षणाच्या चळवळीने जोर धरला.आपल्या या पवित्र भारत देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान स्री शिक्षणाच्या बाबतीत अतिशय मोलाचे आहे हे त्रिवार सत्य आहे!!!
.. . सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाला महत्त्व देत असताना असताना त्यांना अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अनंत अडचणीतून या फुले दांपत्यांनी स्री शिक्षणाचा पाया घातला.
^म्हणून या महिला दिनाच्या निमित्ताने शेवटी मी असे सांगू इच्छितो की;
✓^^नारी मध्ये शक्ती आहे भारी;
समजू नका तिला आता बिचारी...
करू नका स्रीयांचे शोषण;
नाहीतर देशाचे होईल कुपोषण.^^
^✓महिला दिनानिमित्त माझ्या संपूर्ण माता-भगिनींना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा
==जयहिंद==
[पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ]
साकुरी; तालुका =राहाता .जिल्हा =अहिल्यानगर
मो ९६०४७९७३१६
0 Comments