कायगाव येथील गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन चालले अडीच तास अखेर प्रशासन नमले.


      
जिवन आनंदराव मावस (गंगापूर वार्ताहर)
                                     
आज दिनांक 12 जानेवारी कायगाव येथील जलसममाधी आदोलन चालले अडीच तास चालले.
त्यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लेखी पत्रामध्ये पिक विम्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे तसेच गंगापूर तालुक्यातील सर्व गावाची यादी शासनाच्या अनुदान पोर्टलवर अपलोड केलेली आहेत,अनुदान वाटप प्रक्रिया चालू आहे.राहिलेल्या अनुदान तात्काळ पाठपुरावा करून लाभार्थ्याच्या खात्यावर त्वरित टाकण्यात येईल. विहीर ढसाळल्याचे बाबतचे १०५१ विहिरीचे पंचनामे करण्यात आहेत व मूळ अनुदान देण्यात आली आहे.

 तरी भाऊसाहेब गवळी यांनी सांगितले की लवकरात लवकर राहिलेली अनुदानाचे, पिक विम्याचे व घर पडझडीचे व घरात पानी शिरल्याचे पैसे दिले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय छ. संभाजीनगर यांच्याकडे धाव घेतली जाईल किंवा न्यायालयात जावे लागेल असे सांगितले. त्यावेळी शेतकरी भाऊसाहेब गवळी, बापूसाहेब गायकवाड,रामदास माने, भागचंद जण,ज्ञानेश्वर इष्टके, कल्पेश गायकवाड,रामेश्वर गायकवाड, दिलीप गवळी, गणेश गायकवाड, प्रशांत गवळी, बाळासाहेब गायकवाड,सुरेश मिसाळ,अनिल बिरुटे,प्रकाश गवळी,संतोष सोनवणे, निलेश कान्हे, बाबासाहेब साळवे,अनिल कान्हे,रवी शिंदे, नवनाथ काकडे,यादव कान्हे,संपत कान्हे,बाळासाहेब नजन, रामचंद्र बीरुटे, संदीप गवळी,रामा चित्ते, दिलीप बिरुटे,विजय नजन, महेश फाजगे,आमराव पाहुणे, उमा नजन, अजय जगधने,भैय्या तगरे,नारायण इष्टके,रमेश पंडुरे, उत्तम मोहीम.हे सर्व जण उपस्थित होते.
त्यावेळी लेखी पत्र देतानी महसूल नायब तहसीलदार वाघमारे साहेब कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन मंडळाधिकारी सरपंच हरीभाऊ माळी पोलीस पाटील संदीप चित्ते तलाठी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तुपे आदी सर्व हजर होते.

Post a Comment

0 Comments