जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडून  भव्य रक्तदान शिबिराचे राजुरीत आयोजन 


विजय बोडखे 

राजुरी वार्ताहर अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदाय आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केले जाते त्याचप्रमाणे यावर्षीही दिनांक 4 जानेवारी ते दिनांक 18 जानेवारी 2026 दरम्यान संपूर्ण राज्यभरात पंधरा दिवस रक्तदान कॅम्प आयोजित केले आहे त्यातील उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील रामानंद संप्रदाय व जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने रुग्णांची रक्ताची गरज भागविण्यासाठी राहता शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अमिनिया हिमोफेलिया थैलेसमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्लीवरचे पेशंट जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहे तुमच्यासाठी ते फक्त रक्तदान आहे मात्र गरजू रुग्णांसाठी ते आहे जीवनदान त्यामुळेच स्वतःबरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांना सुद्धा तुम्ही या रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शिकविणेप्रमाणे तुम्ही स्वतः रक्तदान करून इतरांनाही रक्तदान करण्यास प्रवृत्त करा.
 जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व रामानंद संप्रदायाचे वतीने रुग्णांची गरज लक्षात घेऊन हे जीवनदान महा कुंभ रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहे जिल्हाभरात 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत विविध ठिकाणी शिबिरे होणार आहेत बुधवार दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी  येथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्त संकलित केले जाणार आहे .
संकलित करण्यात आलेले रक्त शासकीय रक्तपेढीना देण्यात येणार आहे यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांनी तरुणांनी महिलांनी व युवा युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे 
 रक्तदानाचे फायदे रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणारे पेशींना प्रेरणा मिळवून 48 तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते रोगप्रतिकार शक्ती वाढते नियमित तीन ते चार महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब कर्करोग हृदय विकार होण्याचे प्रमाण कमी होते 
 रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान 
मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे परंतु रक्तदानाने कोणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजात मायक्रोसाईटिक ऍमेनिया सिकलसेल थैलेसेमिया हिमोफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फिलीवर अशा गंभीर आजाराशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता आपले फक्त पाच मिनिटे आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटाची असली तरी एका थेंबामुळे एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो एखादे बालक नव्याने श्वास घेते तर एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येतो असे हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे.

Post a Comment

0 Comments