श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात रोख पट्टी धोरण; शेतकऱ्यांमध्ये समाधान



दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान उपबाजार आवारात जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल अशाच आडतदारांना कांदा खरेदी लिलाव बोलीस सहभागी होता येईल,  असा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतल्यामुळे,  टाकळीभान उपबाजारात 15 आडत्या पैकी ९ अडते कांदा खरेदी लिलावात सहभागी झाले होते.
         श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे उपबाजार समितीमध्ये 25 ते 30 खेड्यामधून कांदा उत्पादन शेतकरी कांदा घेऊन येतात. आठवड्यातून 6 दिवस मोकळा कांदा व गोणी कांद्याचा लिलाव केला जातो ,कांद्याची जास्त आवक असल्याने या उप बाजारामध्ये एकूण 15 आडते कांदा खरेदी करण्यासाठी असतात. शेतकऱ्यांची काही अडत्या कडून फसवणूक होताना दिसून आली आणि अशा घटना अनेक बाजार समितीमध्ये घडल्या असल्याने कांदा मार्केट बदनाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची आर्थिक लूट न होता संचालक बोर्डाने हा नियम लागू केल्यामुळे जो  शेतकऱ्यांचा कांदा लिलाव करून शेतकऱ्यांना तात्काळ रोख पेमेंट करील, अशाच आडत्यांना कांदा खरेदी लिलावास सहभागी होता येणार आहे. 
याची प्रथमच अंमलबजावणी टाकळीभान उपबाजार या ठिकाणी नवीन हंगाम सुरू झाल्यापासून करण्यात आली. त्यामुळे 15 अडतेदारांपैकी जे अडते आर्थिक सक्षम आहेत त्याच आडत्यांचा कांदा खरेदी लिलावात सहभाग दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून या निर्णयामुळे  शेतकरी वर्गांमधून समाधान व्यक्त केले.

 चौकट :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की बाजार समिती ही शेतकऱ्यांनी हित बघणारी संस्थाअसून व्यापारी देखील या संस्थेचे मुख्य घटक आहेत कामकाज बघताना शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल साधने गरजेचे आहे. काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे बुडवल्याची प्रकरणे घडले आहेत त्यास धरतीवर सावधगिरी बाळगण्यासाठी शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळावेत याची दक्षता घेण्यात येत आहे.

चौकट - मार्केट कमिटी संचालकांनी घेतलेला निर्णय हा योग्य असून, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबेल , - - श्रीधर गाढे कांदा उत्पादक शेतकरी.

Post a Comment

0 Comments