दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान उपबाजार आवरत जो आडतदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना रोख पेमेंट देईल अशाच आडदारांना कांदा खरेदी लिलाव बोलीस सहभागी होता येईल, असा निर्णय पणन संचालक कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतल्यामुळे, टाकळीभान उपबाजारात 15 आवडत्या पैकी 6 आवडते कांदा खरेदी निलावात सहभागी झाले होते ,
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे उपबाजार समितीमध्ये 25 ते 30 खेड्यामधून कांदा उत्पादन शेतकरी कांदा घेऊन येतात. आठवड्यातून 6 दिवस मोकळा कांदा व गोणी कांद्याचा लिलाव केला जातो ,कांद्याची जास्त आवक असल्याने या उप बाजारामध्ये एकूण 15 आडते कांदा खरेदी करण्यासाठी असतात. परंतु काही अडत्यांनी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या कांद्याच्या मालाच्या पट्ट्या दिल्या नसल्याने त्यामुळे काही शेतकऱ्यांची काही अडत्या कडून फसवणूक होताना दिसून आली आणि अशा घटना अनेक बाजार समितीमध्ये घडल्या असल्याने कांदा मार्केट बदनाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची आर्थिक लूट न होता पणन संचालक बोर्डाने हा नियम लागू केल्यामुळे जो शेतकऱ्यांचा कांदा लिलाव करून शेतकऱ्यांना तात्काळ रोख पेमेंट करील, अशाच आडते कांदा खरेदी लिलावास सहभागी होता येणार ,याची प्रथमच अंमलबजावणी टाकळीभान उपबाजार या ठिकाणी शनिवार दि.3 मे 2025 पासून सुरू करण्यात आली. त्यामुळे 15 अडतेदारांपैकी केवळ 6 अडते कांदा खरेदी लिलावास सहभाग दिसून आला.त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबून या निर्णयामुळे शेतकरी वर्गांमधून समाधान व्यक्त केले
चौकट :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की बाजार समिती ही शेतकऱ्यांनी हित बघणारी संस्थाअसून व्यापारी देखील या संस्थेचे मुख्य घटक आहेत कामकाज बघताना शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल साधने गरजेचे आहे. काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे बुडवल्याची प्रकरणे घडले आहेत त्यास धरतीवर सावधगिरी बाळगण्यासाठी शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळावेत याची दक्षता घेण्यात येत आहे
चौकट -पनन व मार्केट कमिटी संचालकांनी घेतलेला निर्णय हा योग्य असून, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबेल , - - श्रीधर गाढे कांदा उत्पादक शेतकरी.
0 Comments