छत्रपती शिवाजी महाराज डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बसवा उपमुख्यमंत्री शिंदे ,यांना डॉक्टर वंदना मुरकुटे यांचे निवेदन,



टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ताबडतोब आणून बसविण्यात यावे - 
डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचे उपमुख्यमंत्र्यांना आवाहन .

  श्रीरामपूर शहरात  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लवकरात लवकर आणून बसविण्यात यावे , या जागेचे भूमिपूजन होऊनही आद्यपर्यंत पुतळे बसविण्यात आलेले  नाही. 

यासंदर्भात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून चर्चा करून निवेदनाद्वारे केली.
  या निवेदनात डॉ. वंदना मुरकुटे  यांनी म्हटले आहे की, “या दोन्ही महापुरुषांचे पुतळे नासिक येथे तयार असून , नगरपालिका दरमहा भाडे रक्कम भरत असते. 
  या प्रश्नात प्राधान्य क्रमाने उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष  घालून जिल्हाधिकारी याना आदेश द्यावेत 
    असेही डॉ. मुरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान)

Post a Comment

0 Comments