लोहगाव ( प्रतिनिधी) राज्याचा मुख्यमंत्री हा वरिष्ठ नेते ठरवतील तोच होईल असे स्पष्ट मत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस उलटले आहेत मात्र, अजून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नाही. पण, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा राहणार असे संकेत मिळत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात आले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.
त्यांनी नुकतीच लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठकही घेतली. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आपणास आशिर्वाद राहिला आहे.पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद आहे. मागील अडीच वर्ष सरकारमध्ये मला दिलेल्या संधीत मी चांगल काम करून दाखवल आहे .तोच विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व आपल्यावर दाखवील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री पदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत.
त्यामुळे वेगळं मागण्याचे कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्याबद्दल विश्वास असून निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदा बाबत सांगितलं की,माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मात्र ते नाराज असण्याचे काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भुमिका त्यांनी नुकतीचं घेतली आहे.शिवाय मुख्यमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम वर खापर फोडणाऱ्या विरोधकांना देखील चांगलेच फैलावर घेतले आहे.
0 Comments