शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचे सत्र काही केल्या मात्र थांबेना त्यातच महावितरण कडून लोड शेडिंगच्या त्रासाने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र राहता तालुक्यातील राजुरी येथे सध्या पहावयास मिळत आहे.
राहाता तालुक्यातील राजुरी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी केबलसह चोरीला जात असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या असून याकडे मात्र कोणतीही यंत्रणा गांभीर्याने पाहताना दिसत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.शनिवारी रात्री राजुरी प्रवरा डावा कालव्या शेजारी शेतात विहिरीमध्ये बाळासाहेब दत्तात्रय भालेराव यांचीमोटार शनिवारी रात्री चोरीला गेली आहे.त्यांची ३ महिन्यात दोनदा मोटार,केबल चोरीला गेली.तर दुसरे शेतकरी शंकर सोपान पठारे यांची मोटार केबल वायर चोरीला गेली असून बाळासाहेब पुनाजी गोरे यांची मोटारीची केबल शनिवारी रात्री चोरीला गेल्याची घटना घडली असून याबाबत लोणी पोलीस स्टेशनला या शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार दिली असून लोणी पोलिसांनी या ठिकाणी येऊन चौकशी करून गेले आहेत.गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोटार चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून यामध्ये चोरीला गेलेल्या मोटारी या अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेल्या नसून यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत असून या भुरट्या चोरांचा तपास लावावा अशी मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.राजुरी बाबळेश्वर ममदापूर तसेच या परिसरातील वाड्या त्यावरील अनेक मोटारी,केबल चोरीस गेलेल्या आहेत परंतु नको कुणाची झणझट म्हणून शेतकरी मात्र चर्चा करून त्यावर तोडगा काढून दुसरे नवीन मोटर आणून टाकणे पसंत करत आहेत.कारण तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे तक्रार न केलेली बरी असे अनेक शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवले आहे.एकूणच शेतकरी मोठ्या प्रमाणात मेणाकोटीला आलेला दिसत असताना कोणत्या न कोणत्या पद्धतीने शेतात पिकवलेल्या माल विक्रीसाठी नेल्यानंतर त्यालाही भाव मिळत नाही त्यातच अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे एकूणच या झालेल्या प्रकाराचे गांभीर्याने दखल घेऊन या भुरट्या चोरांचा तपास पोलीस खात्याने लावावा अशी मागणी राजुरी येथील शेतकरी संघटनेचे बाळासाहेब भालेराव,शंकर पठारे,बाळासाहेब गोरे यांच्यासह ज्यांच्या मोटारी चोरी गेलेल्या अशा सर्व शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. चौकट शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब दत्तात्रय भालेराव यांनी मोटार चोरी बद्दल अशी प्रतिक्रिया दिली आहे की माझी 3 महिन्यात दोनदा इलेक्ट्रिक मोटार वायरसह चोरीला गेली आहे.अशा प्रकारे जर चोरीचे सत्र चालू राहिले तर शेतकरी यांनी करावे तरी काय त्यांना एकच पर्याय उरणार आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ? अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
0 Comments