श्रीरामपूरच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आज टाकळीभान कडकडीत बंद



 टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर येथील घडलेल्या आकाश दुबय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला तसेच टाकळीभान येथील सतीश मायकल रणनवरे यांच्यावरही झालेला श्रीरामपूर येथे भ्याड हल्ला याच्या निषेधार्थ म्हणून आज मंगळवार दि. १४ जुलै २०२६ रोजी, सर्व व्यापारी वर्ग, सर्व संघटना सर्व व राजकीय पक्ष यांच्यावतीने टाकळीभान गाव स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवण्यात आले.

               टाकळीभान पोलीस स्टेशन समोर सर्वपक्षीय यांच्यावतीने सकाळी ९ वाजता शोकसभा घेण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये या गुन्हेगारीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ही जनता या गुन्हेगारीमुळे भयभीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काही कार्यकर्त्यांवर हल्ले झालेले आहेत, तसेच टाकळीभान गावातील मायकल रणनवरे यांच्या मुलावर श्रीरामपूर मध्ये किरकोळ गोष्टींमुळे येथील गुन्हेगारांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे. टाकळीभानच्या बुद्ध विहार प्रसंगी ही काही गुंड टाकळीभान मध्ये येऊन त्यांनी दहशत केली होती, तसेच इतरही काही वादामध्ये श्रीरामपूरचे गुन्हेगार उपस्थित असतात ,त्यामुळे टाकळीभान गाव सुद्धा असुरक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तरी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांची दहशत मोडून काढावी असे मत त्यांनी व्यक्त केले. 
  याप्रसंगी राजेंद्र कोकणे, भारत भवार, नारायण काळे,अविनाश लोखंडे, आदींनी या घटनेचा निषेध व्यक्त करून स्वर्गीय आकाश दुबय्या यांना गावच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित यांचे आभार बापूसाहेब शिंदे यांनी मानले.याप्रसंगी गावातील व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सदर निवेदन पोलीस हे.कॉ. बर्डे यांना ग्रामस्थांनी यावेळी दिले. यावेळी पो, हे,कॉ, कुमार वैसाने त्याने चौक बंदोबस्त ठेवला होता,व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

Post a Comment

0 Comments