कै. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आदी मागण्यांचे शिर्डी प्रांताधिकारींना अ.भा. सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने देण्यात आले निवेदन!

शिर्डी ( प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या केलेल्या सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.व कै. देशमुख यांच्या कुटुंबियांना संरक्षण व आर्थिक सहाय्य शासनाने करावे या मागणीसाठी गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी  अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालये व कामकाज बंद ठेवण्यात येवून  शिर्डीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी यांनी‌ कार्यालयात हे  निवेदन स्वीकारूनआपल्या मागण्या शासनाकडे कळविण्यात येतील. असे आश्वासन यावेळी दिले.
अशी माहिती अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांनी दिली.
   शिर्डी प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की,  अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचाअ.भा‌ सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने निषेध करण्यात येत असून या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे. त्याचप्रमाणे फरार आरोपींना त्वरित अटक करावी. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दर महिन्याला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत यांच्या सरपंच उपसरपंच यांना पोलीस संरक्षण मिळावे आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. हे निवेदने
शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी ,तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
यासंदर्भात बोलताना पुणतांब्याचे जिल्हा परिषद मा .सदस्य डॉक्टर धनंजय वहाडणे म्हणाले की, तळागाळातील गोरगरिबांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सरपंचाची अशी निर्गुण हत्या होत असेल तर लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. या घटनेचा शासनाने त्वरित शोध लावून आरोपींना अटक करावी. अशी मागणी त्यांनी केली. तर सरपंच महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांनी म्हटले की, मस्साजोग सारख्या घटनाची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच ,सदस्य यांनी या घटनेचा निषेध म्हणून गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी  ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून व  कामकाज बंद ठेवून निषेध नोंदवला आहे. शांततेत बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तर सरपंच महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यावेळी म्हणाले की, 
मस्काजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा अ.भा. सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करत आहे.तसेच कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अ.भा.सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने आर्थिक सहाय्य केले जाईल. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत सरपंच महासंघाच्या वतीने करणार असल्याचे यावेळी बाळासाहेब जपे यांनी सांगितले.
शिर्डी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी बाळासाहेब जपे, डॉक्टर धनंजय धनवटे , सावळीविहीरचे सरपंच ओमेश जपे, शांताराम जपे, सोपान पवार,गणेश आगलावे, राजेंद्र जपे,भारत नेतकर, राजू 
आसराज आगलावे, कैलास पळसे, आनंद जपे,निलेश आरणे, प्रभाकर जपे, पुणतांबेचे सरपंच, आदीसह आजी व माजी सरपंच ,उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments