भऊर (ता. वैजापूर) वार्ताहर जगताप अविनाश
*मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासात सदगुरू नारायणगिरी महाराज यांचेही मोलाचे योगदान - निजामशाहीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मिळाले होते मराठवाड्याला स्वातंत्र्य*
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्रच राहिले होते. निजाम मीर उस्मान अली खान याने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता.
या जुलमी राजवटीविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू झाला.
त्यातच सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांचे देखील विशेष असे मोलाचे योगदान होते. त्यांनी गोदावरीच्या सराला बेटावर स्वातंत्र्य सैनिकांना आश्रय देऊन जनजागृतीचे कार्य केले होते. व त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अन्न वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती तसेच त्यांनी आपल्या कथा कीर्तनातून निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध जनजागृती तयार करून जुलमी निजामाच्या राजवटीविरुद्ध जनसामान्यांच्या मनात आक्रोश तयार केला व त्यातूनच मराठवाडा मुक्ती संग्रामाने अधिकच पेट घेतला
निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकारांची सेना उभी करून जनतेवर अत्याचार सुरू केले होते.
अखेर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने १३ सप्टेंबर १९४८ रोजी 'ऑपरेशन पोलो' ही पोलीस कारवाई सुरू केली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली. मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यातr विलीन झाला.
या मुक्ती संग्रामात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ध्वजारोहण व अभिवादनाचे कार्यक्रम घेतले जातात.
आमचे भऊर, सुराळा, हिंगोली कांगोणी हे गावे मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने खोपडी धोत्रे ही गावे आमच्या अगदी लगत असून देखील आमच्या गावातील जनसामान्यांना त्यांच्याशी शेळी बकरू, गाय बैल किंवा अन्नधान्य असा विक्री व्यवहार करण्यास निजामाच्या रझाकाराकडून अनंत अडचणी येत असेल असे आमच्या गावातील जुनी नागरिक सांगतात.
0 Comments