टाकळीभान प्रतिनिधी- (दिलीप लोखंडे)
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व साहित्यिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सहभागी होऊन श्रीरामपूरचा ठसा साहित्य संमेलनातही उमटविला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना भेटून त्यांनी ‘योगीराज गंगागिरी ते सद्गुगुरु नारायणगिरी’ महाराज हे स्वलिखित पुस्तक त्यांना भेट दिले.
डॉ. वंदनाताई यांना साहित्य संमेलनात ‘विशेष निमंत्रित’ म्हणून निमंत्रित केले होते. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंतचे चर्चासत्र, कवी संमेलन, परिसंवाद आदी उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःच्या कर्तुत्वाची झलक दाखवून श्रीरामपूरचे नाव शतगुणित केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उषा तांबे, सूत्रसंचालक समीरा गुजर, बीव्हीजे ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, पश्चिम बंगालच्या खासदार सागरीका घोष, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, निर्भीड पत्रकार संजय आवटे, रविंद्र शोभणे, गायिका मधुरा वेलणकर, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत , संजय नहार व अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन साहित्य संवाद केला.
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.ताराबाई भवाळकर यांनी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक करून तरुणांनी लेखन व संशोधनात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले.
(सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान)
0 Comments