वाराणसी (काशी)- राजकुमार गडकरी--)---- वाराणसी म्हणजे काशीमध्ये दशहरा गंगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी गंगानदी होय. सर्वात पवित्र नदी म्हणजे गंगेला महत्व दिले जाते. वाराणसी मध्ये गंगा नदी ही उत्तर वाहिनी झाली आहे. त्यामुळे येथे तिला फारच महत्त्व निर्माण झाले आहे त्यामुळे तेथे गंगा स्नान, गंगा आरती व दर्शनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दशहरा उत्सावामुळे हजारो भाविक येथे आलेले आहेत. ते आमच्याबरोबरच गंगा स्नान, गंगा आरती व दर्शनाचा आनंद घेत आहेत.
गंगा नदीच्या काठी या दहा दिवसांत जो उत्सव साजरा करतात, त्याला दशहरा असे म्हणतात. या उत्सवामुळे काशीत लाखो भाविकांनी गंगा स्नान केले. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सर्व घाटावर गंगास्नानासाठी गर्दी दिसत होती. दशहरा उत्सव मंगळवारपासून सुरू झाला आहे.तोदहा दिवस चालणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम वाराणसी होत आहेत.
दशहरा म्हणजे गंगोत्सव. तसे पाहिले तर प्रत्येक नदी ही गंगेसमानच पवित्र आहे , गंगाच आहे. तिचा हा उत्सव
दशहरा हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करतात.
जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ शुद्ध दशमीपर्यंत शंकराच्या देवळांतून हा उत्सव साजरा केला जातो.
अभिषेक पत्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे.
रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते अकरा वेळा म्हटले की एक एकदष्णी होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केलें की एक अतिरुद्र होतो. अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची , उपासनेची एक पद्धत आहे. त्या उत्सवाचा आज मंगळवार पासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ सुरू झाले.ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच गंगादशहरा असे म्हणतात.
गंगा ही केवळ एक नदी नाही, तर हिंदुस्थानचा इतिहास, भूगोल, साहित्य संस्कृती या सर्वांचा गतीप्रवाह गंगेच्या प्रवाहाशी जणू एकरूप झाला आहे. आपल्या संस्कृतीचे खास वैभव असे, की आपण नेहमीच निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. इथला निसर्ग, इथले पाऊसपाणी आणि इथली एकुण परिस्थिती नेहमीच्या जगण्या-वागण्यात प्रतिबिंबीत व्हावी, अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे आणि ही रचना हजारो वर्षे अबाधितपणे आचरणात आणली जात आहे.
नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. त्यात वाराणसीला गंगेला खूप महत्त्व आहे. ती उत्तर वाहिनी वाहते म्हणूनच उत्तर वाहिनी गंगेमध्ये स्नानासाठी भाविकांचे आज दशहरा उत्सवा पासून मोठी गर्दी होत आहे.अगदी शपथ घ्यायची झाली तरी ‘गंगा की सौगंध’ म्हणून घेतली जाते.
परमपूज्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, महाकवी कालिदास आणि अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्यरचना केली आहे. ही गंगा भूतलावर जेंव्हा अवतीर्ण झाली, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा!
त्या उत्सवाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ! ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच ‘गंगादशहरा’ असे म्हणतात.ईश्वाकू कुळातील राजा भगीरथ याने आपल्या पूर्वजांना परलोकी गती मिळावी, म्हणून भगवान शंकराची आराधना करून ही नदी भारतवर्षात आणली, अशी कथा आहे. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली व यश मिळवले. म्हणून आजही एखाद्या कार्यसिद्धीसाठी घेतलेल्या कष्टाला, प्रयत्नाला `भगीरथ प्रयत्न’ असे म्हणतात.
गंगा ही हिमालयाची कन्या, ती सागराला मिळते. गंगा ही फक्त शिवमंगलाच नव्हे, तर ज्ञानाची आणि परमसौंदर्याची साक्षात मुर्ती आहे, म्हणूनच महेश्वर तिला मस्तकी धारण करतो. सर्वांना जल स्वरूपात जीवनदान देणारी माता, सर्वांचे मनोरथही पूर्ण करते. ती पापनाशिनी आहे. म्हणून आपण आंघोळ करताना ‘गंगेचे श्लोक’ म्हणतो. जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला त्या श्लोकाद्वारे होतो. गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषधी गुणधर्म असल्याचेही सांगतात. आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते.
मोगल बादशहा स्वारीस जाताना गंगेचे पाणी आपल्याबरोबर भरून घेत असे. त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी पिण्यास चालत नसे. आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात शेवटी गंगाजल व तुलसीपत्र घालतात.
गंगा निर्मलच आहे,व अनेक अडचणींवर मात करत, सभोवतालच्या झाडाझुडपांना, पशुपक्ष्यांना पाणी देत, वाढवीत, अनेक लोकांची तहान भागवीत,ही धरती `सुजलाम-सुफलाम’ बनवीत, गंगा शेवटी आपल्या प्रियकरला म्हणजे सागराला जाऊन मिळते. तिचा आदर्श घेऊन आपणही आपले ध्येय समोर ठेऊन अनंत अडचणींवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करू या आणि एकमुखाने म्हणूया, ‘जय गंगे भागीरथी’. असे हभप संजय जी महाराज जगताप यांनी माहिती दिली आहे. गंगा नदी ही गंगोत्रीला उगम पावते व गंगासागर ला मिळते. बाराही महिने गंगा वाहती असते व तिने सर्व परिसर सुजलाम सुफलाम सुद्धा केला आहे. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये येथे गर्दी भाविकांची स्नानासाठी मोठी झाली होती . आता दशहरा महोत्सव येथे दहा दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. गंगेच्या किनारच्या सर्व घाटांवर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. सायंकाळी दश्वमेधघाटावर गंगा आरतीला भाविकांची मोठी गर्दी होती.होडीतून अनेकांनी गंगा आरती केली.अनेकांनी यावेळी गंगेत दिवे सोडले.हर हर गंगेचा सर्वत्र नारा ऐकू येत होता.
0 Comments